Statue Of Unity - Sardar Vallabhbhai Patel Info

सरदार वल्लभभाई पटेल – Statue Of Unity | Sardar Vallabhbhai Patel Info

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

थोर व्यक्तींची माहिती

Statue Of Unity | Sardar Vallabhbhai Patel : भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक प्रशासकीय शिल्पकार होते. ते दिसायला अतिशय शांत आणि निसर्गतः मिळालेल्या आपल्या स्वभावाबद्दल ओळखले जातात. सरदार वल्लभाई पटेल प्रथम “गृहमंत्री” आणि भारताचे पहिले “उपपंतप्रधान” होते. तसेच वल्लभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे म्हणजेच न्यू इंडियाचे “शिल्पकार” म्हणून ओळखले जातात.

वल्लभभाई पटेल यांना “लोहपुरुष” म्हणून देखील ओळखले जाते. ते शूरवीरांपेक्षा कमी नव्हते. २०० वर्षांच्या गुलामगिरीत अडकलेल्या देशातील विविध राज्यांना त्यांनी एकत्र करून भारतात विलीन केले (Sardar Vallabhbhai Patel) आणि या मोठ्या कार्यासाठी त्यांना लष्करी बळाची ही गरज भासली नाही. ही त्यांची सर्वात मोठी कीर्ती होती. जी त्यांना सर्वांपासून वेगळी करते.

Table of Contents

Sardar Vallabhbhai Patel Quotes in Marathi – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष
भारतरत्न सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना विनम्र अभिवादन

भारतीय इतिहासातील लोहपुरुष
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या जयंती निमित्त त्यांना
कोटी कोटी नमन

Sardar Vallabhbhai Patel Information In Marathi

सरदार पटेल शपथ घेताना
सरदार पटेल शपथ घेताना

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवन परिचय

नाववल्लभभाई झवेरभाई पटेल
जन्मतारीख३१ ऑक्टोबर १८७५
जन्मस्थळनडियाद, बॉम्बे प्रेसिडेन्सी (सध्याचे गुजरात)
आईलाडबाई
वडीलझवेरभाई पटेल
शिक्षणएन.के हायस्कूल, पेटलाड; इन्स ऑफ कोर्ट, लंडन, इंग्लंड
मुलेमणिबेन पटेल, दह्याभाई पटेल
पत्नीझावेरबा
मृत्यू१५ डिसेंबर १९५०
स्मारकसरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक (statue of unity), गुजरात
पदवीसरदार, लोहपुरूष , थोर शिल्पकार ,पहिले उपपंतप्रधान , गृहमंत्री

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म व बालपण

सरदार वल्लभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ झाली गुजरात मधील नडियाद या गावी त्यांच्या मामाच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई आणि माता लाडबाई यांचे ते चौथे पुत्र होते. त्यांचे वडील खेडा जिल्ह्याच्या कर्मचारी गावचे रहिवासी होते. सोमाबाई, नरसिंहाबाई, आणि विठ्ठलभाई ही त्यांची मोठी भावंडे होती. (Statue Of Unity) त्यांना एक काशीबाई नावाचा भाऊ व दहीबाई नावाची धाकटी बहीण होती.सरदार वल्लभभाई यांचे लग्न जवळच्या गावातील बारा-तेरा वर्षाच्या जवेराबई यांच्यासोबत झाले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिक्षण

सुरुवातीच्या काळात घरचे लोक त्यांना नालायक समजायचे, आपण काही करू शकत नाही असे त्यांना वाटले. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी मॅट्रिक पूर्ण केले. आणि अनेक वर्षे कुटुंबापासून दूर राहून, वकिलीचा अभ्यास केला. यासाठी त्यांना उधार पुस्तके देखील घ्यावी लागली. यादरम्यान त्यांनी नोकरी केली. आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह ही केला.सरदार वल्लभाई पटेल १९०० मध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१३ मध्ये लंडन मधून बॅरिस्टर पदवी संपादन करून भारतात ते परत आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे कौटुंबिक जीवन

सरदार वल्लभाई पटेल यांच्या जीवनातील एक विशिष्ट घटनेवरून त्यांच्या प्रामाणिकपणाचा अंदाज लावता येतो. सरदार वल्लभाई पटेल यांचे लग्न झाल्यानंतर वकील याची परीक्षा वल्लभभाई यांनी पास केली व त्यांनी गोधरा येथे झवेरबाई यांच्यासोबत आपल्या कौटुंबिक जीवनाची सुरुवात केली. नंतर त्यांना दोन मुले झाली.मनिबेन,डाह्याभाई अशी त्यांच्या मुलांची नावे होती. त्यावेळी गुजरातमध्ये प्लेगची साथ आली होती. त्या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थळी हलविले.जेव्हा त्यांच्या पत्नीला बॉम्बे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्या पत्नीचा कर्करोग आणि मृत्यू झाला.

त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाला नकार दिला. आणि आपल्या मुलांना आनंदी भविष्य देण्यासाठी कठोर परिश्रम केले. इंग्लंडला जाऊन त्यांनी ३० महिन्यात ३६ महिन्यांचा अभ्यास पूर्ण केला. त्यावेळी ते कॉलेजमध्ये टॉपर होते. यानंतर ते भारतात परतले. आणि अहमदाबाद मध्ये यशस्वी आणि प्रसिद्ध बॅरिस्टर म्हणून काम करू लागले होते. (Statue Of Unity) ते इंग्लंडहुन परतले होते, त्यामुळे त्यांची चाल बदलली होती. त्यांनी युरोपियन शैलीतील सूटबूट घालण्यास सुरुवात केली. भरपूर पैसे कमवून मुलांना चांगले भविष्य देण्याची त्यांची स्वप्न होते. पण नियतीने त्यांचे भविष्य अगोदरच ठरवले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे सामाजिक कार्य

गांधीजींचे विचारांनी प्रेरित होऊन, त्यांनी समाजकंटकांच्या विरोधात आवाज उठवला. भाषणातून माणसे गोळा केली. अशा प्रकारे रस नसतानाही ते हळूहळू सक्रिय राजकारणाचा भाग बनले. गुजरातचे रहिवासी असलेले, वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या स्थानिक भागात दारू, अस्पृश्यता आणि स्त्रियांवरील अत्याचार विरुद्ध प्रथम लढा दिला. हिंदू मुस्लिम एकी टिकून ठेवण्यासाठी, त्यांनी खूप प्रयत्न केले. १९१७ मध्ये गांधीजींनी वल्लभाई पटेल यांना खेड्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून, इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यास प्रेरित करण्यास सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे खेडा आंदोलन

त्या काळात फक्त शेती हे मोठे साधन होते. परंतु शेती ही नेहमीच निसर्गावर अवलंबून राहिली आहे. त्या दिवसांची परिस्थिती अशी होती की, १९१७ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली होती. परंतु, तरीही इंग्रजांच्या राजवटीत विधिभूत कामे करणे बाकी होते. ही आपत्ती पाहून, वल्लभभाईंनी गांधीजीसह शेतकऱ्यांना कर न भरण्यास भाग पाडले आणि शेवटी ब्रिटिश सरकारला सहमती द्यावी लागली. आणि हा पहिला मोठा विजय ठरला जो खेडा आंदोलन म्हणून स्मरणात आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा बारडोली सत्याग्रह

वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान 1928 मध्ये गुजरातमधील बारडोली सत्याग्रह हे एक प्रमुख शेतकरी आंदोलन होते. त्यावेळी प्रांत सरकारने शेतकऱ्यांच्या करात तीस टक्के वाढ केली होती. पटेल यांनी या भाडेवाढीला कडाडून विरोध केला. (Statue Of Unity) हे सत्याग्रह आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली, पण शेवटी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. ब्लूमफिल्ड, न्यायिक अधिकारी आणि महसूल अधिकारी, मॅक्सवेल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, महसुलातील 22 टक्के वाढ चुकीची असल्याचे आढळून आले आणि ते 6.03 टक्के केले.

या सत्याग्रह आंदोलनाच्या यशानंतर तेथील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ ही पदवी दिली. बार्डोली शेतकरी संघर्षाच्या संदर्भात शेतकरी लढा आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करताना गांधीजी म्हणाले की, असा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक प्रयत्न आपल्याला स्वराज्याच्या जवळ घेऊन जातो आणि आपल्या सर्वांना स्वराज्याच्या समीप नेणारा हा संघर्ष थेट स्वराज्याकडे नेत आहे.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय जीवन

लखनऊ मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात १९१६ मध्ये वल्लभभाई पटेल यांनी गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते. अहमदाबाद नगरपालिकेतून निवडून सुद्धा आले होते आले.

१९१७ मध्ये त्यांनी खेड सत्याग्रहात भाग घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी साराबंदी चळवळीचे नेतृत्व सुद्धा केले होते. शेवटी या चळवळी पुढे सरकारला नतमस्तक व्हावे लागलेले होते. (Statue Of Unity) आणि सर्व कर हे परत घ्यावे लागले होते. जून १९१८ मध्ये या गांधीजींनी विजय साजरा केलेला होता. आणि त्याचबरोबर त्यावेळी वल्लभभाई पटेल यांना बोलावून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलेले होते.

अहमदाबाद मध्ये सरकारच्या कायद्याचा निषेध सुद्धा केलेला होता. आणि या निषेधार्थ या कायद्याच्या निषेध मध्ये यांचा खूप मोठा वाटा होता. वल्लभभाई पटेल यांनी आपले आयुष्य असहकार चळवळीला देशासाठी वाहून घेतलेले होते. आणि त्याचबरोबर त्यांना महिन्याला हजारो रुपये पगार मिळवणारी वकिली सोडलेली होती.

१९२० साली वल्लभभाई पटेल यांनी नागपूर झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व होते.१९२१ मध्ये ते गुजरात प्रांत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. नागपूर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून हजारो सत्याग्रह जमलेले होते. आणि त्याचबरोबर हा लढा जो आहे हा लढा साडेतीन महिने पूर्ण उत्साहाने सुरू झाला.आणि सरकारने हा लढा धडकण्याचा अशक्य प्रयत्न सुद्धा केलेला होता. शेतकऱ्याच्या साराबंदीत चळवळीचे नेतृत्व यांनी केलेले होते. (Statue Of Unity) आणि या चळवळीमध्ये यशस्वी सुद्धा झालेले होते. आणि त्यामुळे बार्डोलीच्या शेतकऱ्याकडून त्यांना “सरदार” हा बहुमान सुद्धा देण्यात आलेला होता. १९३१ मध्ये कराची येथील राष्ट्र काँग्रेसचे अधिवेशनाचे जे अध्यक्ष पद होते. हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषवलेले होते

अखिल भारतीय किसान सभा व स्टुडन्ट फेडरेशनची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली. १९३८ ते १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात वल्लभभाई पटेल यांचा सहभाग होता. (Statue Of Unity) आणि हा सहभाग असल्यामुळे त्यांना कारावात सुद्धा झालेला होता.१९४६ मध्ये स्थापन झालेल्या इंटरमिजिएट अॅक्टींग कॅबिनेटमध्ये पटेल गृहमंत्री होते. त्याचबरोबर घटना समितीचे सदस्य ही वल्लभभाई पटेल होते. स्वातंत्र्य नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान व गृह खाते त्याचबरोबर माहिती प्रसारण घटक राज्यासंबंधीचे प्रश्न हे खाते यांनी सांभाळलेली होती.

स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांची कारकीर्द

गांधीजींच्या इच्छेचा आदर करत बहुतांश प्रांतीय काँग्रेस समित्या पटेलांच्या बाजूने असल्या तरी पटेलांनी स्वतःला पंतप्रधानपदाच्या शर्यतीपासून दूर ठेवले आणि त्यासाठी नेहरूंना पाठिंबा दिला. त्यांच्याकडे उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती . मात्र त्यानंतरही नेहरू आणि पटेल यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले. त्यामुळे अनेकवेळा दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती.

गृहमंत्री म्हणून त्यांचे पहिले प्राधान्य मूळ संस्थानांचे (राज्य) भारतात विलीनीकरण होते. रक्त न सांडता त्यांनी हे काम पूर्ण केले. हैद्राबाद संस्थानातील ऑपरेशन पोलोसाठी त्यांना सैन्य पाठवावे लागले . (Statue Of Unity) भारताच्या एकात्मतेत त्यांच्या महान योगदानासाठी त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते .

सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान (लोहपुरुषाची प्रतिमा मिळाली)

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यानंतर देशाची स्थिती अत्यंत गंभीर होती. पाकिस्तान वेगळे झाल्यामुळे, अनेक लोक बेकार झाले. त्यावेळी एक संस्था होती. (Statue Of Unity) प्रत्येक राज्य स्वतंत्र देशासारखे होते. जे भारतात विलीन होणे अत्यंत आवश्यक होते. हे काम खूप अवघड होते. अनेक वर्षांच्या गुलामगिरी नंतर कोणताही राजा कोणत्याही प्रकारच्या वंशासाठी तयार नव्हता. पण वल्लभभाईंना सर्वांची खात्री होती. त्यांनी संस्थानांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि कोणतेही युद्ध न करता एकत्र येण्यास भाग पाडले.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाचे देशात विलीनीकरण केले

जम्मू-काश्मीर, हैदराबाद, आणि जुनागडचे राजे या करारासाठी तयार नव्हते. त्यांच्याविरुद्ध लष्करी बळाचा वापर करावा लागला. आणि अखेरीस ही संस्था नाही भारतात आली. अशा प्रकारे वल्लभाई पटेल यांच्या प्रयत्नामुळे ५६० संस्थांना रक्तस्राव न होता भारतात आली. (Statue Of Unity) संस्थानांचे भारतात एकीकरण करण्याचे हे कार्य १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर, अवघ्या काही महिन्यात पूर्ण झाली. हे काम फक्त सरदार पटेलच करू शकतात असे गांधीजींनी सांगितले.

भारताच्या इतिहासापासून आजपर्यंत संपूर्ण जगात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखा एकही माणूस नव्हता. ज्याने हिंसा न करता देश एकात्मतेचे उदाहरण मांडले आहे. त्या काळात त्यांच्या यशाची चर्चा जगभरात वृत्तपत्रांमध्ये होत होती. त्यांची तुलना महान लोकांशी केली जात होती. (Statue Of Unity) पटेल पंतप्रधान असते तर, आज पाकिस्तान, चीन सारख्या समस्यांनी एवढे मोठे रूप धारण केले नसते, असे म्हटले जाते. वल्लभभाईची विचारसरणी इतकी परिपक्व होती की पत्राची भाषा वाचून ते समोरच्या व्यक्तीच्या भावना समजू शकत होते.

त्यांनी नेहरूंना अनेकदा चीन पासून सतर्क केले, पण नेहमी त्यांचे कधीच ऐकले नाही. आणि परिणामी भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले. स्वातंत्र्यानंतर ते देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले. या पदावर असताना त्यांनी देशातील राज्यांना एकत्र करण्याचे काम केले. ज्यामुळे त्यांना लोहपुरुषाची प्रतिमा मिळाली.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन

१९४८ मध्ये गांधीजींच्या मृत्यूनंतर, पटेल यांना त्याचा खूप आघात झाला. आणि काही महिन्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातून ते सावरू शकले नाही, आणि १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांनी हे जग सोडले. स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचे स्मारक म्हणून बांधले गेले.

सरदार वल्लभभाई पटेल जयंती | Sardar Vallabhbhai Patel Jayanti

भारत सरकारने २०१४ पासून असं जाहीर केलं की, सरदार पटेल यांचा जन्मदिवस भारतात, “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा केला जाईल. त्यांच्या कार्याची उंची पाहता (Statue Of Unity) गुजरातमध्ये त्यांची जगातील सर्वात उंच प्रतिमा – स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यात आली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार

  • नागपूर विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, आणि त्याचबरोबर उस्मानिया विद्यापीठ या सगळ्या विद्यापीठांकडून यांना डि.लीट ही मानाची पदवी देण्यात आलेली.
  • सरदार वल्लभभाई पटेल यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला.
  • वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.
  • २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते.

Statue Of Unity | सरदार वल्लभभाई पटेल

Statue Of Unity सरदार वल्लभभाई पटेल
सरदार वल्लभभाई पटेल - Statue Of Unity | Sardar Vallabhbhai Patel Info 6
स्थानसाधू बेट, राजपीपळा, गुजरात
रचनाकारराम सुतार
प्रकारपुतळा
ऊंची१८२ मीटर
वजन६७,००० मेट्रिक टन
सुरुवात३१ ऑक्टोबर २०१४
पुतळ्याचे उद्घाटन३१ ऑक्टोबर २०१८
उद्घाटन कोणी केलेभारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी   

स्टॅचू ऑफ युनिटीची वैशिष्ट्ये

हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राजपीपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळिल साधू बेटावर उभारलेला आहे. भारतीय मूर्तिकार राम सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार झाला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले. आणि मध्य-ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले. पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हटलं जात असून हा जगातला सर्वांत उंच पुतळा आहे. 

सुरुवातीला पाया बांधण्यात आला. त्यानंतर मेझानाइन फ्लोअर बांधण्यात आलं. नंतर पुतळा ज्यावर उभं करण्यात आला आहे. तो चौथरा बनवण्यात आला. या ठिकाणी एक गॅलरी उभी करण्यात आली आहे. जिची क्षमता 200 लोकांची आहे. जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांनी या स्मारकाच्या निर्मितीचं काम केलं आहे. (Statue Of Unity) त्यात काही चीनी कामगारांचासुद्धा समावेश आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं वजन 67,000 मेट्रिक टन आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 12,000 कांस्य पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी 1850 टन कांस्य लागलं.

वल्लभभाई पटेल यांची विशेषता

  • शेतकऱ्याकडून वल्लभभाई पटेल यांना “सरदार” मानाची पदवी मिळाली होती.
  • त्याचबरोबर भारताचा “लोहपुरुष” म्हणून यांना ओळखले जाते.
  • तसेच भारताच्या एकीकरणाचे थोर “शिल्पकार” म्हणून व सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते.
  • पहिले “उपपंतप्रधान” आणि त्याचबरोबर “गृहमंत्री” हे पद वल्लभभाई पटेल यांनी भूषवले होते.

वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तके

  • पोलादी राष्ट्रपुरुष (अरुण करमरकर) : या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘चेतना पुरस्कार’ प्रदान झाला. (मे २०१७).
  • महामानव सरदार पटेल (अनुवादित, अनुवादक – सुषमा शाळिग्राम; मूळ गुजराथी, लेखक – दिनकर जोषी)
  • लोहपुरुष (सुहास फडके)
  • लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (मूळ इंग्रजी – लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक – विलास गिते.)
  • सरदार पटेल (मूळ इंग्रजी लेखक – आर.एन,पी. सिंग; मराठी अनुवाद – जयश्री टेंगसे)

वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल 10 वाक्ये

  • १) सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद शहरात झाला.
  • २) सरदार पटेल यांनी इंग्लंडमधून कायद्याची पदवी मिळवली आणि गुजरातमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी भारतात परतले.
  • 3) ते ब्रिटीश सरकारच्या विरोधात होते आणि म्हणून त्यांनी ऑफर केलेली सर्व पदे नाकारली.
  • 4) पटेल यांनी 1891 मध्ये झवेरबेन पटेल यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले झाली.
  • 5) सरदार पटेल महात्मा गांधींमुळे खूप प्रभावित झाले आणि ते गांधीवादी तत्त्वांचे अनुयायी बनले.
  • 6) त्यांनी 1918 मध्ये शेतकऱ्यांसाठी ‘नो टॅक्स कॅम्पेन’ चे नेतृत्व केले जे एक शांततापूर्ण मोहीम होती.
  • 7) मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना 1930 मध्ये तुरुंगवासही झाला होता.
  • 8) 1931 मध्ये सरदार पटेल यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • 9) पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते आणि त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 पर्यंत काम केले.
  • 10) सरदार पटेल यांनी 15 डिसेंबर 1950 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जगाचा निरोप घेतला.

FAQ

१. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्नीचे नाव काय होते?

सरदार वल्लभाई पटेल यांचे लग्न झाल्यानंतर वकील याची परीक्षा वल्लभभाई यांनी पास केली व त्यांनी गोधरा येथे झवेरबाई यांच्यासोबत आपल्या कौटुंबिक जीवनाची सुरुवात केली. नंतर त्यांना दोन मुले झाली.मनिबेन,डाह्याभाई अशी त्यांच्या मुलांची नावे होती.

२. वल्लभभाई पटेल यांचे पूर्ण नाव काय?

सरदार वल्लभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ झाली गुजरात मधील नडियाद या गावी त्यांच्या मामाच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई आणि माता लाडबाई यांचे ते चौथे पुत्र होते.

३. सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू कधी झाला?

१९४८ मध्ये गांधीजींच्या मृत्यूनंतर, पटेल यांना त्याचा खूप आघात झाला. आणि काही महिन्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातून ते सावरू शकले नाही, आणि १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांनी हे जग सोडले.

४. भारताचा पहिला लोहपुरुष कोण आहे?

वल्लभभाईची विचारसरणी इतकी परिपक्व होती की पत्राची भाषा वाचून, ते समोरच्या व्यक्तीच्या भावना समजू शकत होते. त्यांनी नेहरूंना अनेकदा चीन पासून सतर्क केले, पण नेहमी त्यांचे कधीच ऐकले नाही. आणि परिणामी भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले. स्वातंत्र्यानंतर ते देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान झाले. या पदावर असताना त्यांनी देशातील राज्यांना एकत्र करण्याचे काम केले. ज्यामुळे त्यांना लोहपुरुषाची प्रतिमा मिळाली.

५. सरदार वल्लभभाई पटेल यांची पात्रता काय होती?

सरदार वल्लभाई पटेल १९०० मध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१३ मध्ये लंडन मधून बॅरिस्टर पदवी संपादन करून भारतात ते परत आले.

Leave a Comment